सामाजिक लोकशाही चे जनक...
💙💙💙💙डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर💙💙💙
लोकशाही जिवंत राहण्यासाठी बाबासाहेबाचे विचार. .....
बाबासाहेब घटना सादर करताना म्हणतात ,"आम्ही भारतीय लोक मिळवलेले स्वातंत्र्य परत गमावणार तर नाही? भारतीयांना काही स्वतःच्याच विश्वासघा ताने व देशद्रोही पणा मुळे स्वातंत्र्य गमवावे लागेलं , या चिंतेने माझे मन ग्रासले आहे . जातीभेद , पंथभेद या जून्या शत्रुमध्ये परस्पर विरोधी नविन पक्षांची भर पडली आहे. आम्हीं आपल्या पक्ष,पंथ, धर्म, भाषांना देशापेक्षा व राष्ट्र हिता पेक्षा अधिक महत्त्व दिले तर आम्ही आपले स्वातंत्र्य गमावून बसू . म्हणून आपण देशरक्षणासाठी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे". लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी काही पथ्ये कटाक्षाने पाळायची खबरदारी घ्यायला सांगितले . हिंसात्मक आंदोलन व माध्यमांचा अवलंब केला जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.हिंसात्मक आंदोलने म्हणजे बेबंदशाहीची बाराखडी होय . सनदशीर मार्गांचा च अवलंब करावा . विभुतीपुजा टाळावी . महान व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी . परंतु आपले विचारस्वातंत्र्य गहाण टाकू नये अशी त्यांची स्पष्ट पथ्ये आहे.....
देशात , समाजात , जातिधर्माच्या नावाने विषमता असू नये . धर्म सहिष्णुता असावी. धर्म द्वेष नसावा. लोकशाहीच्या यशासाठी संवैधानिक नीतिमत्ता व सामाजिक लोकशाही शिवाय स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार नाही . निवडणुकांमध्ये धनसत्ता व बलसत्तेचा गैरवापर व धुड धूस होऊ नये. ' वन मॅन वन व्हॉट' बरोबरच ' वन व्हॉट वन व्हॅल्यू ' ची ही अंमलबजावणी व्हावी , यावर त्यांनी भर दिला......
लेक आवडल्यास शेअर करा ...
जय भीम.......

Comments
Post a Comment